AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा होता जगातील पहिला मोबाईल, वजन आणि किंमत ऐकून आश्चर्य वाटेल; चार्जिंगबाबत ऐकाल तर हसू फुटेल

हा फोन अत्यंत वजनदार होता. या मोबाईलचं वजन जवळपास 2 किलो होतं. तो खिशात ठेवून चालणं अशक्य होतं. त्यामुळे हा मोबाईल हातात ठेवावा लागायचा किंवा कमरेला बांधावा लागायचा.

असा होता जगातील पहिला मोबाईल, वजन आणि किंमत ऐकून आश्चर्य वाटेल; चार्जिंगबाबत ऐकाल तर हसू फुटेल
Mobile PhoneImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 21, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली: आधी जे तंत्रज्ञान अत्यंत महागडं असतं नंतर ते अत्यंत स्वस्त होतं. पण त्यावेळी त्या तंत्रज्ञानाची क्रेझ प्रचंड असते. जेव्हा ती वस्तू हातात अन् रोजच्या जीवनातील भाग बनते तेव्हा तिची क्रेझ कमी होऊन जाते. मोबाईलही त्यापैकी एक. मोबाईल आला तेव्हा तो प्रचंड महागडा होता. वजनदार होता. वायरलेस होता. त्याची किंमतही खूप होती. त्यामुळे एवढ्याश्या मोबाईलमधून दूरवरच्या माणसासोबत बोलता येतं याची त्याकाळी प्रचंड क्रेझ होती. शिवाय मोबाईल जवळ असणं म्हणजे श्रीमंतीचं लक्षण मानलं जात होतं. आज मात्र, मोबाईल लहान मुलांपासून ते अबालवृद्धांपर्यंत आणि गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांकडे आहे. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

मोबाईल फोनचा स्मार्ट फोन होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत रोचक आहे. लँडलाईनपासून ते मोबाईलपर्यंतचा हा प्रवासही तसा थक्क करणारा आहे. अनेक दशकापूर्वी पहिला मोबाईल फोन विकला गेला होता.

हा मोबाईल फोन इंजिनीअर मार्टिन कुपर यांनी तयार केला होता. त्यांनी 1970च्या दशकात मोटरोला कंपनी ज्वाईन केली होती. मार्टिन कुपर यांनी 1973मध्ये हा मोबाईल बनवला होता.

अडीच लाखाचा मोबाईल

जगातील पहिला मोबाईल फोन अमेरिकेत विकला गेला होता. 1983ची ही गोष्ट आहे. आज आपण स्मार्ट फोनवर सर्व प्रकारची डिल्स चेक करतो. मात्र, पहिल्या मोबाईल फोनची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. जगातील पहिल्या मोबाईल फोनची किंत 2500 पाऊंडस होती. म्हणजे जवळपास 4 हजार डॉलर. म्हणजेच आजच्या काळातील 2.5 लाख रुपये.

वजन 2 किलो

हा फोन अत्यंत वजनदार होता. या मोबाईलचं वजन जवळपास 2 किलो होतं. तो खिशात ठेवून चालणं अशक्य होतं. त्यामुळे हा मोबाईल हातात ठेवावा लागायचा किंवा कमरेला बांधावा लागायचा. त्या काळाच्या हिशोबाने हे तंत्रज्ञान नवे होते. त्यामुळे त्याची किंमत अधिक होती.

बॅटरी खांद्यावर, चार्जिंग 10 तास

विशेष म्हणजे या मोबाईलची बॅटरी खांद्यावर लटकवून चालावे लागे. हा मोबाईल चार्ज करण्यासाठी 10 तास लागायचे. विशेष म्हणजे एवढा वेळ चार्जिंग करूनही मोबाईलची चार्जिंग अवघे 30 मिनिटचं राहायची.

मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात
मुंबईच्या रुईया कॉलेज परिसरात ग्रंथोत्सव 2026 ला सुरुवात.
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले
विलिनीकरण होणार की नाही? अनिल देशमुख स्पष्टच बोलले.
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
राज्यातील एक सुजलाम सुफलाम जिल्हा दाखवा; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल.
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले
राज्य मागे पडले; शेतकरी, बेरोजगारी, गुंतवणूक..वडेट्टीवार सरकारवर बरसले.
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध
विरोधकांचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला विरोध.
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर
ठाकरे बंधूंच्या युतीवर मिठाचा खडा पडलाय?राऊतांनी दोन शब्दात दिले उत्तर.
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर...
चंद्रपूर महापौर वादावर संजय राऊतांचा पलटवार, संपूर्ण खापर शिवसेनेवर....
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना
भरधाव कारच्या धडकेत वृद्धेचा मृत्यू; नागपूरमधील दुर्दैवी घटना.
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार
मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार.
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात
एकनाथ शिंदे 2 दिवसांपासून विश्रांतीसाठी दरे गावात.