AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेक्स पॉवरसाठी आंध्रात गाढवांवर संक्रांत? मोठ्या प्रमाणात कत्तलीच्या घटना उघड !

आंध्र प्रदेशमध्ये लैंगिक क्षमता वाढावी यासाठी गाढवाची कत्तल करुन त्याचं मांस खाल्लं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Donkey slaughter in Andhra Pradesh for increase sex power).

सेक्स पॉवरसाठी आंध्रात गाढवांवर संक्रांत? मोठ्या प्रमाणात कत्तलीच्या घटना उघड !
प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : फेसबुक)
| Edited By: | Updated on: Jul 13, 2021 | 11:24 AM
Share

अमरावती (आंध्र प्रदेश) : गाढव! या प्राण्याला जगातील सर्वात शांत, संयमी आणि मेहनती प्राणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माणसाला शेतीपासून अनेक कामांसाठी गाढवाचा उपयोग होतो. गाढव त्याच्या मालकाचं ओझं वाहण्याचं काम करतो, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. याशिवाय गाढवीनीचं दूध हे आरोग्यासाठी पोषक असतं, असंही म्हणतात. या गाढवाने माणसाला अनेक माध्यमातून मदतच केलीय. मात्र, हाच माणूस गाढवाच्या अस्तित्वावर उठलाय. आंध्र प्रदेशमध्ये लैंगिक क्षमता वाढावी यासाठी गाढवाची कत्तल करुन त्याचं मांस खाल्लं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Donkey slaughter in Andhra Pradesh for increase sex power).

आंध्र प्रदेशात अनेक भागांमध्ये गाढवाच्या कत्तली

भारतात अनेक लोक गाढवाचं देखील मांस खातात. आंध्र प्रदेशात गाढवाचं मांस खाण्याबाबत अनेक वेगवेगळे तर्क आहेत. गाढवाचं मांस खाल्ल्याने अनेक रोगांपासून दूर होता येतं, असं आंध्र प्रदेशच्या लोकांचं म्हणणं आहे. गाढवाचं मांस खाल्ल्याने श्वास घेण्यास अडथडा येत असलेली समस्या दूर होते. त्याचबरोबर गाढवाचं मांस खाल्लं तर लैंगिक क्षमता वाढते, असा त्यांचा दावा आहे. आंध्र प्रदेशच्या लोकांच्या अशा प्रकारच्या भावनांमुळे तेथील लोक अन्नात गाढवाचं मांस खातात. आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरीसह अनेक जिल्ह्यांमध्ये गाढवाच्या कत्तली केल्या जात आहेत. यामध्ये कृष्णा, प्रकाशम आणि गुंटूर यांचा समावेश आहे. या भागांमध्ये गाढवाच्या मांसाची खपत मोठ्या वेगात होते (Donkey slaughter in Andhra Pradesh for increase sex power).

आंध्र प्रदेशात गाढवाचं मांस 600 रुपये किलो

आंध्र प्रदेशात गाढवांच्या कत्तलीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गाढवांची कत्तल करुन त्याचे अवशेष असेच कुठेतरी उघड्यावर किंवा गटारीत फेकले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. याशिवाय तेथील बाजारात गाढवाचं मांस 600 रुपये किलोच्या किंमतीत विकलं जात आहे. मांस विकणारा व्यापारी एक गाढव 15 ते 20 हजार रुपयाच विकत घेत आहे. पण निष्पाप गाढवांच्या या कत्तली रोखणं सरकारपुढे मोठं आव्हान होऊन बसलं आहे.

महाराष्ट्रातही गाढवांची संख्या कमीच

आंध्र प्रदेशात 2019 मध्ये गाढवांची संख्या फक्त 5 हजार इतकी होती. याशिवाय महाराष्ट्रातही गाढवांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. महाराष्ट्रातील गाढवांची संख्या कमी होत असल्याने गेल्यावर्षी राज्याच्या अॅनिमल हज्बेंड्री डिपार्टमेंटने गाढवाच्या कत्तली रोखण्यासाठी सर्व जिल्हाधिकारींसाठी एक सर्कुलर जारी केला होता. विशेष म्हणजे पशू अधिकार कार्यकर्ता आणि केंद्रीय माजी मंत्री मेनकाल गांधी यांनीदेखील गाढवांची संख्या घटण्यामागे त्यांची होणारी कत्तल हेच कारण सांगितलं होतं.

गाढवांना मारणं हे बेकायदेशीरच

देशातील अनेक राज्यांमध्ये गाढवाची संख्या कमी होत चालली आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये एकही गाढव शिल्लक राहणार नाही, अशी भीती वर्तवली जात आहे. यामागे कारण म्हणजे गाढवाच्या मांससाठी त्याची सर्रासपणे कत्तल. त्यामुळे काही सामाजिक संस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे भारतीय अन्न आणि मानक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार गाढव हा ‘फूड अॅनिमल’ नाही. त्यामुळे त्याचं मांस खाण्यासाठी त्याला मारणं हे कायदेशीर नाही.

हेही वाचा : फोन घ्यायचा विचार करताय? हा फोन तब्बल 10 हजारांनी स्वस्त!

Follow Us
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....