AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावातून अचानक गायब बकऱ्या, सत्य कळताच गावकऱ्यांना हादरा, म्हणाले हा दानव…

goat disappeared : या गावात एका मागून एक बकऱ्या आणि कोंबड्या गायब होऊ लागल्या. सुरुवातीला गावकऱ्यांना हे भुरट्या चोरांचे काम वाटले. पण या घटना वरच्यावर वाढतच गेल्या. त्यामुळे मग गावकऱ्यांनी पहारा बसवला आणि ते सत्य बाहेर आले...

गावातून अचानक गायब बकऱ्या, सत्य कळताच गावकऱ्यांना हादरा, म्हणाले हा दानव...
त्या गावात काय घडलंय?
| Updated on: Aug 03, 2025 | 4:13 PM
Share

तर इतर गावांप्रमाणेच या ही गावात रोजचे रहाटगाडे सुरू होते. शेतीची, मशागतीच्या कामातून फुरसत काढत गावाच्या पारावर गप्पा मारत. या गप्पातून सर्वांच्या लक्षात आलं की, गावातून कोणाची तरी कोंबडी गायब तर कोणीची शेळी गायब झाली आहे. मग वरचेवर हा प्रकार वाढू लागला. सुरुवातीला गावकऱ्यांना हे गावातीलच कुणा भुरट्याचे काम असावे असे वाटले. पण तरीही छडा लागेना. तेव्हा मग पहारा देण्यात आला. तेव्हा जे सत्य समोर आले. त्याने गावकरी उडालेच. काय घडलं त्या गावात?

बिहारमधील पश्चिमी चंपारण या भागात बगहा हे गाव आहे. या गावात कधी नव्हे ते गावकरी इतके भयभीत झाले. कारण ही तसेच होते. या गावात भला मोठा अजगर समोर आला. हा अजगर 20 फुटांहून सुद्धा लांब होता. त्याला पाहताच अनेकांची बोबडी वळाली. काहींना घाम फुटला. काहींनी तर बोंब ठोकत धूम ठोकली. पण गावातील काही जिगरबाजांनी मनाचा हिय्या करत त्याला पकडलेच. आत अजून एखादा अजगर गावात लपून तर बसला नाही ना, याची गावकऱ्यांनी पंचक्रोशीत फिरून पहाणी केली.

घराच्या मागे शोधले लपण्याचे ठिकाण

गावातील संजय कुमार नावाच्या युवकाच्या घरामागे हा अजगर लपला होता. गावात गेल्या काही दिवसांपासून कोंबड्या आणि बकऱ्या गायब होण्याचे कारण त्याला पकडल्यानंतर गावकऱ्यांच्या लक्षात आले. अजगरासाठी हे गाव म्हणजे जणू कुरणच झाले होते. रात्रीच्या वेळी तो सावज पकडायचा आणि दिवसा या घरामागील दाट जागेत लोळत पडायचा. कोणतेही लहान मुलं अथवा माणसाला त्याने इजा केली नाही. पण कदाचित एखाद्या लहान मुलावर त्याने हल्ला केला असता तर, या विचारानेच गावकरी गलितगात्र होतात.

कोंबड्या, बकऱ्या गायब

बगहा येथील रहिवाशी परिसरातच या अजगराने स्वतःचे खास ठिकाण शोधले होते. दिवसभर वर्दळ आणि गजबज असल्याने तो दिवस निपचीत पडून राहत असे. रात्र झाली की मात्र मग तो सावज टिपण्यासाठी बाहेर पडत असे. गेल्या 6 महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. गावकरी कोंबड्या आणि बकऱ्या कोण चोरून नेते या विचाराने हैराण झाले होते. भुरट्या चोरांवर त्यांनी पाळत सुद्धा ठेवली. पण त्यांनी कोंबड्या चोरल्या नसल्याचे समोर आले. त्यानंतर मग रात्री जागता पहारा ठेवला. तेव्हा हा अजगर दिसून आला. हा दानव गेल्या सहा महिन्यांपासून गावात असल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिली.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.