मुंबई : भारतामध्ये (India) झालेल्या एका सर्वेक्षणाने सर्वांनाच एक मोठा धक्का दिला आहे. कोरोनामुळे (Covid 19) जवळपास सर्वच देशांचे दिवाळे निघाले आणि प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली. मात्र, हुरुनच्या रिपोर्टनुसार कोविडच्या काळात भारतात श्रीमंतांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, स्वत:ला आनंदी समजणाऱ्या अशा करोडपतींच्या संख्येत घट झाली आहे. तज्ञांच्या मते, कोविडदरम्यान खर्च करण्याबाबत सावध भूमिका घेण्यासह अर्थव्यवस्थेत तीव्र पुनर्प्राप्ती दरम्यान गुंतवणूक (Investment) मूल्यात वाढ झाल्याचा फायदा करोडपतींना झाला आहे.