AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC : बॅग भरा, बाहेर पडा, अख्खा देश पालथा घाला नी आरामात पैसे भरा..रेल्वेचा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?

IRCTC : बॅग भरा आणि फिरायला चला, अशी खास ऑफर IRCTC ने आणली आहे..

IRCTC : बॅग भरा, बाहेर पडा, अख्खा देश पालथा घाला नी आरामात पैसे भरा..रेल्वेचा भन्नाट प्लॅन माहिती आहे का?
प्रवास करा, पैसे द्या नंतरImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 18, 2022 | 7:08 PM
Share

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांकरीता (Railway Passengers) खूशखबर आहे. आता त्यांना रेल्वे तिकिट न खरेदी करता ही पर्यटन करता येईल. हो, अगदी खरं आहे. ही ऑफर (Offer) इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आणली आहे. तुम्ही फिरून आल्यावर अगदी निवांत तिकिटाची रक्कम अदा करु शकता. तर काय आहे ही ऑफर पाहुयात..

रेल्वे यात्रेकरुंसाठी IRCTC ने ही अनोखी ऑफर आणली आहे. त्यासाठी तुम्हाला रेल्वे कनेक्ट मोबाईल अॅपचा वापर करता येईल. तसेच ट्रॅव्हल नाऊ पे लॅटर (TNPL) या सुविधेचा लाभ घेता येईल. IRCTC ने फायनानेंशियल प्लॅटफॉर्म CASHe सोबत यासाठी करार केला आहे.

CASHe नुसार, रेल्वे प्रवाशी, ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर या सुविधेचा वापर करुन सामान्य तिकिटांशिवाय तात्काळ तिकीटही बूक करु शकतात. त्यासाठी त्यांना या प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.

CASHe ने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांना IRCTC च्या रेल कनेक्ट या अॅपचा वापर करावा लागेल. त्याठिकाणी TNPL पेमेंटचा पर्याय निवडता येईल. त्याआधारे, रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल.

एकदा हा पर्याय निवडल्यावर प्रवाशाला आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करावी लागणार आहे.

ही संपूर्ण प्रक्रिया कोणत्याही कागदपत्राविना सहजसोप्या पद्धतीने रेल्वेच्या प्रवाशांसाठी उपलब्ध असेल. TNPL च्या माध्यमातून खरेदी केलेल्या रेल्वे तिकिटांची किंमतीची परतफेड प्रवाशांना हप्त्यांमध्ये करता येईल.

तिकिट दरांची परतफेड करण्यासाठी प्रवाशांना काही कालावधी देण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रवाशांना 3 ते 6 महिन्यात ही रक्कम अदा करावी लागेल. या नवीन सुविधेमुळे रेल्वे प्रवाशांना रेल्वे तिकिटासाठी तात्काळ रक्कम जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.