AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Card : दोन पॅन कार्ड हवेत कशाला तुम्हाला? सापडला तर बसेल असा दंडम की..

Pan Card : दोन पॅन कार्ड जवळ बाळगायला ते काही मेडल नाहीत. पण त्यासाठी तुम्हाला दंड लागेल त्याचं काय..

Pan Card : दोन पॅन कार्ड हवेत कशाला तुम्हाला? सापडला तर बसेल असा दंडम की..
पॅन कार्ड चा दंडम वाचवाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 05, 2022 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली : आधार कार्डप्रमाणेच (Aadhaar Card) पॅन कार्ड (Pan Card) ही महत्वाचा दस्तावेज आहे. बँकेत खाते उघडायचे असेल वा मालमत्ता खरेदी करायची असेल तर तुम्हाला पॅन कार्ड द्यावे लागते. अशातच तु्मच्याकडे दोन पॅन कार्ड आढळल्यास तुम्हाला दंड (Fine)सहन करावा लागू शकतो.

प्राप्तिकर खात्याने (Income Tax Department) या चुकीच्या दुरुस्तीसाठी अगोदरच तरतूद केलेली आहे. या खात्यानुसार, एकाहून अधिक पॅनकार्ड असल्यास, ही बाब कायद्याच्या विरुद्ध आहे. आयकर अधिनियम 1961 मधील नियम 272B नुसार, तुम्हाला 6 महिन्यांचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

त्यामुळे चुकून जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील तर एक झटपट परत करणे हे शहाणपणाचे लक्षण ठरते. पॅन कार्ड लागोलाग सरेंडर करणे, परत करणे हे हितवाह ठरते. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने याविषयीची प्रक्रिया पूर्ण करता येते.

जेवढ्या लवकरच पॅन कार्ड परत करता येईल, तेवढा तुमचा फायदा अधिक होईल. प्राप्तिकर खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला पॅन कार्ड परत करण्याची प्रक्रिया राबविता येते आणि त्यानंतर पॅन कार्ड परत करता येते.

दोन पैकी एक पॅन कार्ड परत करणय्सााठी तुम्हाला अगोदर प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन Request for news pan card/ And changes Or Correction in pan card या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्याठिकाणी अर्ज डाऊनलोड करावे लागेल. अर्ज भरुन दोन्ही पॅनकार्ड, त्याची सत्यप्रत घेऊन NSDL च्या कार्यालयात जावे लागेल.

अतिरिक्त पॅन कार्ड जमा करताना, त्यासाठी 100 रुपयांच्या बाँडवर सत्यापन करुन द्यावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे पॅन कार्ड सरेंडर होईल. एखाद्याने ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीतर अशा पॅन कार्डधारकांना 10,000 रुपयांचा दंड सहन करावा लागू शकतो.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.