अन्नाच्या नासाडीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; …तर जगातील उपासमारीची समस्या तीन पटीने वाढणार, संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा

देशात अनेक गरीब देश आहेत, ज्या देशांमध्ये उपासमारीची समस्या तीव्र आहे. मात्र दुसरीकडे असे देखील काही देश आहेत, ज्या देशांमध्ये दररोज हजारो टन अन्नपदार्थ वाया जातात.

अन्नाच्या नासाडीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; ...तर जगातील उपासमारीची समस्या तीन पटीने वाढणार, संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 8:53 AM

मुंबई : देशात असे अनेक गरीब देश आहेत की, त्या देशातील लोकांना एकवेळचं जेवण (Meals) देखील पोटभर मिळत नाही. उपासमारी (Starvation) ही त्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. मात्र दुसरीकडे काही देशांमध्ये दररोज हजारो टन अन्न कचऱ्यात फेकले जाते. हा मोठा विरोधाभास आहे. एकट्या मुंबईमध्ये (Mumbai) दररोज तब्बल 69 लाख टन अन्न कचऱ्यात फेकले जाते. संपूर्ण भारताबाबत बोलयाचे झाल्यास भारतात दरवर्षी जेवढे धान्य पिकते त्याच्या 30 टक्के अन्नधान्याची नासाडी होते. असा दावा यूएनच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. सोबतच या अहवालामध्ये असा देखील इशारा देण्यात आला आहे की, जर अन्नाची अशीच नासाडी सुरू राहीली तर 2050 पर्यंत उपासमारीची समस्या आजच्या तुलनेत तीन पटीने वाढू शकते.

धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी

अन्नधान्य नासाडीच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. लग्न, वाढदिवस, वास्तूशांती, अशा विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी भारतात लोकांना जेवणासाठी बोलावण्यात येते. त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्यात येतो. मात्र जेवणासाठी किती लोक येणार याचा अंदाज न घेतल्याने अनेकदा मोठ्याप्रमाणात अन्नपदार्थ वाया जातात. सोबतच आपन रोज जे अन्नपदार्थ बनवतो त्याची देखील मोठ्याप्रमाणात नासाडी होते. एकीकडे देशातील जवळपास वीस कोटींपेक्षा अधिक नागरिक रोज एक वेळंच जेवण करून दिवस काढत आहेत. तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात अन्न वाया जात आहे.

हे सुद्धा वाचा

संयुक्त राष्ट्राचा अहवाल काय सांगतो?

जगात दररोज किती अन्नाची नासाडी होते याबाबत नुकताच ‘संयुक्त राष्ट्रा’च्या वतीने एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतात वर्षाकाठी एकूण तीस टक्के अन्नाची नासाडी होत असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे. भारतात लग्न आणि इतर धार्मिक समारंभांमध्ये वर्षाकाठी तब्बल 40 टक्के अन्नाची नासाडी होत असल्याचा अंदाज आहे. असे देखील संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे. तसेच भारतात रोज जेवनासाठी जे अन्नपादार्थ बनवले जातात ते देखील मोठ्याप्रमाणात वाया जात असल्याचे समोर आले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.