AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्नाच्या नासाडीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; …तर जगातील उपासमारीची समस्या तीन पटीने वाढणार, संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा

देशात अनेक गरीब देश आहेत, ज्या देशांमध्ये उपासमारीची समस्या तीव्र आहे. मात्र दुसरीकडे असे देखील काही देश आहेत, ज्या देशांमध्ये दररोज हजारो टन अन्नपदार्थ वाया जातात.

अन्नाच्या नासाडीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर; ...तर जगातील उपासमारीची समस्या तीन पटीने वाढणार, संयुक्त राष्ट्र संघाचा इशारा
| Updated on: Jun 18, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई : देशात असे अनेक गरीब देश आहेत की, त्या देशातील लोकांना एकवेळचं जेवण (Meals) देखील पोटभर मिळत नाही. उपासमारी (Starvation) ही त्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. मात्र दुसरीकडे काही देशांमध्ये दररोज हजारो टन अन्न कचऱ्यात फेकले जाते. हा मोठा विरोधाभास आहे. एकट्या मुंबईमध्ये (Mumbai) दररोज तब्बल 69 लाख टन अन्न कचऱ्यात फेकले जाते. संपूर्ण भारताबाबत बोलयाचे झाल्यास भारतात दरवर्षी जेवढे धान्य पिकते त्याच्या 30 टक्के अन्नधान्याची नासाडी होते. असा दावा यूएनच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. सोबतच या अहवालामध्ये असा देखील इशारा देण्यात आला आहे की, जर अन्नाची अशीच नासाडी सुरू राहीली तर 2050 पर्यंत उपासमारीची समस्या आजच्या तुलनेत तीन पटीने वाढू शकते.

धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी

अन्नधान्य नासाडीच्या बाबतीत जगात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. लग्न, वाढदिवस, वास्तूशांती, अशा विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी भारतात लोकांना जेवणासाठी बोलावण्यात येते. त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवण्यात येतो. मात्र जेवणासाठी किती लोक येणार याचा अंदाज न घेतल्याने अनेकदा मोठ्याप्रमाणात अन्नपदार्थ वाया जातात. सोबतच आपन रोज जे अन्नपदार्थ बनवतो त्याची देखील मोठ्याप्रमाणात नासाडी होते. एकीकडे देशातील जवळपास वीस कोटींपेक्षा अधिक नागरिक रोज एक वेळंच जेवण करून दिवस काढत आहेत. तर दुसरीकडे मोठ्याप्रमाणात अन्न वाया जात आहे.

संयुक्त राष्ट्राचा अहवाल काय सांगतो?

जगात दररोज किती अन्नाची नासाडी होते याबाबत नुकताच ‘संयुक्त राष्ट्रा’च्या वतीने एक अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार भारतात वर्षाकाठी एकूण तीस टक्के अन्नाची नासाडी होत असल्याचे संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे. भारतात लग्न आणि इतर धार्मिक समारंभांमध्ये वर्षाकाठी तब्बल 40 टक्के अन्नाची नासाडी होत असल्याचा अंदाज आहे. असे देखील संयुक्त राष्ट्र संघटनेने म्हटले आहे. तसेच भारतात रोज जेवनासाठी जे अन्नपादार्थ बनवले जातात ते देखील मोठ्याप्रमाणात वाया जात असल्याचे समोर आले आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.