AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेन्शनर्ससाठी गूड न्यूज: आता 1 तारखेची वाट कशाला, महिन्या संपण्याआधीच खात्यात पेन्शन !

रिझर्व्ह बँकेच्या (RESERV BANK OF INDIA) निर्देशानुसार पेन्शन महिन्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी जमा व्हायलाच हवी असे निर्देश दिले आहेत.

पेन्शनर्ससाठी गूड न्यूज: आता 1 तारखेची वाट कशाला, महिन्या संपण्याआधीच खात्यात पेन्शन !
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 21, 2022 | 8:56 AM
Share

नवी दिल्ली- कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेच्या (Employee Pension Scheme) पेन्शनर्ससाठी महत्वाची बातमी आहे. आता EPS निवृत्ती पेन्शनर्सना वेळेवर पेन्शन मिळणार आहे. प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या तारखेला पेन्शनर्सच्या खात्यात रक्कम वर्ग करण्यात येईल. कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) कडे EPS वेतनधारकांना वेळेत पेन्शन मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत होते. मोठ्या प्रमाणावर आर्थिक कोंडी होत होती. पेन्शन तारखेच्या अनियमिततेवर ईपीएफओनं (EPFO) कठोर पाऊल उचललं आहे. EPS पेन्शनर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी ईपीएफओने 13 जानेवारी 2022 रोजी एक परिपत्रक जारी केले. पेन्शन विभागाद्वारे तक्रारींची छाननी करण्यात आली आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या (RESERV BANK OF INDIA) निर्देशानुसार पेन्शन महिन्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी जमा व्हायलाच हवी असे निर्देश दिले आहेत.

सर्व EPS निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यात महिन्याच्या सुरुवातीलाच पेन्शन दिली जाते. मात्र, अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर उशीर होत होता. नव्या निर्णयामुळे पेन्शन वेळेवर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या निर्णयासाठी मार्च महिन्याचा अपवाद असेल. मार्च महिन्यासाठी एक एप्रिल नंतर पेन्शन खात्यात जमा केली जाईल.

निर्णयाची 100 टक्के अंमलबजावणी

ईपीएफओने बँकांना निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे सक्त आदेश जारी केले आहेत. पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांकडे पेन्शनची रक्कम वितरण तारखेपूर्वी केवळ दोन दिवस आधीच वर्ग करावी असे परिपत्रकात म्हटले आहे. आपल्या सर्व विभागीय कार्यालयांना आपल्या कार्यक्षेत्रातील बँकात पेन्शन महिन्याअखेर जमा होत असल्याची खात्री करावी असे ईपीएफओने म्हटले आहे.

ईपीएस म्हणजे काय?

भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. वीसहून अधिक कर्मचारी किंवा कामगार काम करीत असलेल्या आस्थापनांमध्ये निवृत्ती पश्चात कालावधीची तरतूद म्हणून या योजनेकडे पाहीले जाते. कर्मचारी आणि त्याची मालक आस्थापना दरमहा मूळवेतनाच्या बारा टक्के रक्कम या निधीत प्रत्येकी जमा करतात. या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे सेवानिवृत्तीसमयी एक रकमी लाभ देण्याबरोबरच दोन अतिरिक्त लाभही आहेत. त्यामध्ये निवृत्तीवेतन योजनेचा समावेश होतो. दर महिन्याला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जाते.

इतर बातम्या :

बँकिंगमध्ये व्याज दरवाढीची लाट: जाणून घ्या- SBI, HDFC आणि कोटक महिंद्राचे नवे दर

पझेशनसाठी बिल्डर टाळाटाळ करतोय? मग ही बातमी वाचाच! ताब्यास विलंब, बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका

प्रवासासाठी निघालात, रिचार्ज, बील भरण्याची चिंता नको; रेल्वे स्थानकावरच भरा बील, रेलटेलचा अनोखा उपक्रम

Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.