AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OPS : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा दिवाळी! पेन्शनबाबत मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट

OPS : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच पुन्हा दिवाळी साजरी करण्याची संधी मिळू शकते..

OPS : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा दिवाळी! पेन्शनबाबत मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट
मोदी सरकारकडून गिफ्ट?Image Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Oct 27, 2022 | 3:41 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central government employees) लवकरच पुन्हा दिवाळी साजरी करण्याची संधी मिळू शकते. पेन्शनबाबत (Pension) कर्मचाऱ्यांचा केंद्र सरकारसोबत कधीचा झगडा सुरु आहे. याबाबत तोडगा निघाला असून कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार याविषयीचा निर्णय लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा (Old Pension Scheme-OPS) लवकरच लाभ मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य आणि केंद्रीय कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी आग्रही होते. त्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांनी बाजी मारली आहे.

सुत्रांच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकार (Modi Government) 2023-2024 यादरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांपासूनच्या या मागणीला मंजुरी देऊ शकते. परंतु, अधिकृतरित्या अजून केंद्र सरकारने याविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही.

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी की नाही, याविषयी विधी व न्याय विभागाकडे अभिप्राय मागितला आहे. त्याआधारे केंद्र सरकार या योजनेविषयी निर्णय घेणार आहे. परंतु, कर्मचाऱ्यांची मागणी पाहता केंद्र सरकार पेन्शनबाबत अनुकूल असल्याची चर्चा आहे.

दरम्यान केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनाही मीडियाने याविषयी प्रश्न विचारला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार का, याविषयी माहिती देताना त्यांनी ही योजना लागू करण्याविषयी कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले होते.

कर्मचारी भरती करताना 31 डिसेंबर 2003 अथवा त्यापूर्वीच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा विचार होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने या मुद्यावर विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागितला आहे.

जुन्या पेन्शन योजनेत शेवटी काढलेल्या वेतनावर निवृत्तीवेतन ठरविण्यात येते. या योजनेत महागाई दरानुसार (Inflation rate) महागाई भत्त्यात वाढ होत होती. सरकारने नवीन वेतन आयोग (Pay Commission) लागू केला तर त्यामुळे पेन्शनमध्ये वाढ होत होती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.