AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गव्हाच्या पिठासह दाळी, तांदूळ, तेल, मीठाने जीभेची चव घालवली: 10 वर्षांत किंमती कितीने वाढल्या, तुम्हाला माहिती आहेत का?

देशात पिठाचे दर विक्रमी पातळीवर आहेत. देशात एक किलो पिठाची सरासरी किंमत 33 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. पिठाशिवाय दाळी, तांदूळ, तेल, मीठ यांचेही भाव झपाट्याने वाढले आ

गव्हाच्या पिठासह दाळी, तांदूळ, तेल, मीठाने जीभेची चव घालवली: 10 वर्षांत किंमती कितीने वाढल्या, तुम्हाला माहिती आहेत का?
10 वर्षांत किंमती कितीने वाढल्याImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2022 | 2:17 PM
Share

देशात गव्हाच्या पिठासह (Wheat Flour) दाळी, तांदूळ, तेल, मीठाचा( rice, oil, Salt) तोरा वाढला आहे. हे पदार्थ हळूहळू चैनीच्या वस्तूंच्या यादीत सरकतात की काय एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यात वाढ झाली आहे. गरिबांना सरकारकडून धान्याचा पुरवठा होत असला तरी इतर वस्तुंच्या किंमतीत वाढीने त्यांना ही फटका बसला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याचे (Price Hike) एक उदाहरण पाहुयात. एक व्यक्ती दिवसातून एकावेळी किमान 4 भाकरी खातो. या चार भाकरीसाठी त्याला किती किंमत मोजावी लागते? चला तर या 4 भाकरीची किंमत काढण्याचा प्रयत्न करुयात. 4 भाकरी तयार करण्यासाठी सरासरी 100 ग्रॅम पीठ लागते. दहा वर्षांपूर्वी एक किलो पीठ 22.48 रुपयांना येत असे. या हिशोबानुसार 4 भाकरी तयार करण्यासाठी 2.24 रुपये लागले. त्याचबरोबर आज एक किलो आटा 32.91 रुपये इतका येत आहे. तर 4 रोटी तयार करण्यासाठी 3.29 रुपये खर्च येतो. म्हणजेच 10 वर्षात 4 भाकरीच्या दरात एक रुपयाने वाढ झाली.

सध्या गव्हाच्या पिठाने चाकरमान्यांना महागाईच्या जात्यात भरडले आहे. पिठाच्या किंमती उच्चांकी पातळीवर आहेत. जानेवारी 2010 नंतर पिठाची किंमत विक्रमी उच्चांकावर आहे. ग्राहक मंत्रालयानुसार, देशात 9 मे रोजी एक किलो पिठाची सरासरी किंमत 32.91 रुपये होती. केवळ वर्षभरातच एक किलो पिठाच्या दरात चार रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

का उडाला महागाईचा भडका

यामागे तज्ज्ञ दोन प्रमुख कारणे सांगतात. तज्ज्ञांच्या मते, देशात गव्हाचे उत्पादन घटत असून साठाही कमी होत आहे. याशिवाय देशाबाहेरही गव्हाची मागणी वाढत आहे.

5 महिन्यांत 6% वाढ सरकारी आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीत 9 मे रोजी एक किलो पिठाची किंमत 27 रुपये होती. त्याचबरोबर अंदमानची राजधानी पोर्ट ब्लेअरमध्ये हे पीठ विक्रमी 59 रुपये किलोने विकले जात आहे. मुंबईत एक किलो पीठ 49 रुपयांना मिळत आहे. आकडेवारीनुसार, या वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच पिठाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत आहे. 1 जानेवारीपासून पिठाच्या दरात 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गव्हाच्या उत्पादनात आणखी घट आली आहे. रशिया आणि युक्रेनची जगातील गव्हाची निर्यात हिस्सा एक चतुर्थांश होता. 2019 मध्ये रशियाने 8.14 अब्ज डॉलर्स आणि युक्रेनने 3.11 अब्ज डॉलर्सच्या गव्हाची निर्यात केली होती. या दोन देशांमधील युद्धामुळे जगभरात गव्हाचा तुटवडा निर्माण झाला असून भाव वाढत आहेत. भारतात गव्हाचे भाव वाढण्याचे एक कारण म्हणजे बाहेर भारतीय गव्हाला खूप मागणी आहे, त्यामुळे देशातील भाव वाढू लागले आहेत. याशिवाय डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे गव्हाच्या वाहतूकीचा खर्चही वाढला आहे.

फक्त पीठच नाही तर भात-डाळ, तेल, मीठही महागलं आहे.

केवळ गव्हाचे पीठच नव्हे, तर तांदूळ-डाळी, तेल, मीठ यांचे भावही लक्षणीय वाढले आहेत. 10 वर्षात एक किलो तांदळाच्या दरात 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 9 मे 2013 रोजी एक किलो तांदळाचा सरासरी भाव 25.40 रुपये होता, तो 9 मे 2022 रोजी वाढून 36.07 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे तूरडाळीच्या दरातही 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 10 वर्षांत एक किलो तूरडाळीचा भाव 70 रुपयांवरून 102 रुपयांवर गेला आहे.

याशिवाय तेलाचे भावही वाढले आहेत.भुईमुगाचे तेल 10 वर्षात 43 टक्क्यांनी महागले आहे. मोहरीच्या तेलाचा भाव 84 टक्क्यांनी वाढला आहे. बहुतेक सर्व अधिक तर पामतेल अधिक महाग झाले आहे. पामतेलाच्या किंमतीत 10 वर्षात 140 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, वनस्पती तेल 10 वर्षात तो 129 टक्के महाग झाले आहे.

Follow Us
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....