AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rent Agreement | विश्वासाला कायद्याची जोड, भाडे करारनाम्याने वादावर तोडगा, काय असतो हा करार.

Rent Agreement | विश्वास पानीपतात गेला, असं आपण उगीच म्हणत नाही. तेव्हा भाडेकरु ठेवताना भाडे करार करणे तुम्हाला फायद्याचे ठरते.

Rent Agreement | विश्वासाला कायद्याची जोड, भाडे करारनाम्याने वादावर तोडगा, काय असतो हा करार.
भाडे करारनामा करणे फायद्याचेImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Sep 25, 2022 | 3:59 PM
Share

नवी दिल्ली : अनेकदा घर मालक (Owner) आणि भाडेकरु (tenant)मध्ये कुरबूर होते आणि त्यातून वाद वाढतात. अशावेळी भाडे करार (Rent Agreement) केलेला असला तर दोन्हीच्या फायद्याचा ठरतो. त्यामुळे दोघांचे हक्क अबाधित राहतात. कायदेशीररित्या दोघांनाही दावा दाखल करता येतो. भाडे करारनामा करणे हे कधीही फायदेशीर ठरते.

शहरी आणि ग्रामीण भागात किरायाने अथवा भाड्याने घर घेण्याचे प्रमाण जास्त आहे. नोकरी निमित्त नौकरपेशा वर्ग बदलीच्या ठिकाणी जातो. अशावेळी तो घर भाड्याने घेऊन राहतो. केंद्र सरकारने भाडे करारनामा करण्यासाठी कायदेशीर तरतूद केलेली आहे.

मॉडेल टेनशी अॅक्ट अंतर्गत भाडेकरुला करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. या करारनाम्यात दोन्ही पक्षांसाठी काही तरतूदी, अटी आणि शर्तींचा उल्लेख असतो. त्याचे पालन करणे दोन्ही पक्षांवर बंधनकारक असते. या करारनाम्यामुळे दोन्ही पक्ष कायदेशीररित्या जोडल्या जातात.

घरमालक आणि भाडेकरू यांच्यात कायदेशीर व्यवहार होण्यासाठी केंद्र सरकारने मॉडेल टेनशी अॅक्ट तयार केला आहे. भाडे करारनामा दोन्ही पक्षांसाठी महत्वाचा असतो. या करारनाम्यावर घरमालक आणि भाडेकरूंना स्वाक्षरी करावी लागते. या करारात भाडे, किराया, त्याचा कालावधी आणि अन्य नियमांची माहिती लिखित स्वरुपात असते.

बऱ्याचदा घरमालक आणि भाडेकरु विश्वासावर अथवा खर्च टाळावा यासाठी भाडेकरारनामा करत नाहीत. तर काहीवेळा भाडेकरारनामा करण्यात येतो. पण त्याची नोंदणी करण्यात येत नाही. कारण रजिस्ट्रेशन करताना भाडेकरु आणि घरमालक या दोघांनाही शुल्क द्यावे लागते. यामुळे वादाच्या काळात ताप वाढतो. तसेच ही एकप्रकारे अवैध प्रॅक्टिसला प्रोत्साहनही मिळते.

उपनिबंधकांकडे भाडे करारनाम्याची नोंद केल्या जात नाही. तोपर्यंत तो वैध मानण्यात येत नाही. त्यामुळे भाडे करारनामा करताना अटी व शर्ती वाचून तो उपनिबंधकांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. साक्षीदारांसह हा करारनामा नोंदणी करणे दोन्ही पक्षाच्या फायद्याचे ठरते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.