कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur News) मोठी बातमी समोर आली आहे. कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याचे तब्बल 1346 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. हा महादेवराव महाडीक (Mahadevarao Mahadik) गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. उच्च न्यायालयाकडून (High Court) याबाबतचा निर्णय देण्यात आला आहे. याबाबत सजेत पाटील यांच्या गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर या प्रकरणात राजाराम साखर कारखान्याचे 1346 सभासद अपात्र ठरवण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येनं सभासद अपात्र ठरल्यानं हा महादेवराव महाडीक गटासाठी मोठा धक्का मानण्यात येत आहे. या प्रकरणात सतेज पाटील गटाकडून याचिका दाखल करण्यात आली होती.