4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 28 June 2021

| Updated on: Jun 28, 2021 | 10:40 AM

राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याशिवाय वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेले आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे.

Follow us on

डेल्टा प्लसचा धोका, राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना याशिवाय वेळोवेळी शासनाकडून देण्यात आलेले आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घेण्यास सांगण्यात आलं आहे.