महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकारला निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार नाही, तो निवडणूक आयोगाला आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यामुळे येत्या 5 आणि 6 ऑक्टोबर रोजी राज्यात विविध ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झाला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) धारेवर धरलं आहे. या धर्तीवर औरंगाबादेत आज विविध तालुक्यांमध्ये भाजपची तीव्र आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यामध्ये झटापट झाली.