एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना एक निनावी पत्रं पाठवलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील हे पत्रं आहे. या पत्रात वानखेडेंनी केलेल्या 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतही त्याची माहिती दिली आहे. मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. गेल्या दोन वर्षापासून एनसीबीच्या कार्यालयात कार्यरत आहे. गेल्या वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकणाच्या ड्रग्ज अँगलची चौकशी सोपवण्यात आली. महानिदेशक राकेश अस्थाना यांनी एसआयटीची स्थापना केली.