राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार जास्त काळ टिकणार नसल्याचा दावा सातत्याने केला जातो. मात्र, हे सरकार पूर्ण 5 वर्षे टिकणार असून यात कुठलीही शंका नसल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. पुढे शरद पवार म्हणाले की, स्वबळावरून महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येकजण आप-आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न आहे. तिन्ही पक्षामध्ये उत्तम समन्वय आहे, यामुळे सरकार व्यवस्थित चालत आहे आणि पुढेही चालणार असल्याचे शरद पवार म्हणाले.