दहीहंडी साजरी करण्याच्या मुद्द्यावर मनसे अधिक आक्रमक झाली आहे. दहीहंडी साजरी करता यावी म्हणून मनसेचे ठाणे-पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी आज आमरण उपोषण सुरू केले. मात्र, पोलिसांनी जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून त्यांना नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. मनसेने दहीहंडी साजरी करता यावी म्हणून नौपाडा येथील भगवती मैदानात स्टेज बांधला होता. या ठिकाणी मनसेचे नेते अविशान जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तसेच ठिय्या आंदोलनही सुरू करण्यात आलं होतं