शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपावर निशाना साधला आहे. आमदारांना ट्रेनिंगची गरज असते. सर्व आमदारांना एकत्रं आणलं जात आहे. पूर्वी होत नव्हतं. आता हे होते आहे आणि असे करण्याचीही गरज निर्माण झालीये. ज्यांच्याकडे दोन वोट ज्यादा आहे. त्यांना जिंकण्यासाठी 20 मते हवी आहेत. ते कुठून आणणार? चोऱ्यामाऱ्या करूनच मते मिळवणार ना. म्हणून आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. दहशत दबाव हे सर्व प्रकार लोकशाहीत खुलेआम सुरू आहे. पूर्वी लपून छपून करत होते. आता खुलेआम करत आहेत. असे संजय राऊत म्हणाले आहेत. (sanjay raut) यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही टीका केली. तसेच आघाडीत (mahavikas aghadi) उत्तम समन्वय असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.