एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत शिवसैनिकांना भावनिक साद घातली होती. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा ते मातोश्री प्रवासातली गर्दी अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी होती. मात्र यानंतर आता एका बंडखोर शिवसेना आमदाराने थेट उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यानंतर अनेक राजकीय चर्चांणा उधाण आले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेना आमदारांची अडचण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या न भेटण्यावर आणि आजुबाजुच्या लोकांच्या वागण्यावरही त्यांनी बोट ठेवलं आहे. या आमदार संजय पत्रावर लगेच एकनाथ शिंदे यांनीही ट्विट करत ही भावना आमदारांची आहे, असे म्हणत एका ओळीत आपली भूमिका मांडली आहे.