एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. भाजपा राज्यात शिवसेनेच्या मदतीने वाढले, शिवसेनेसोबत राहून भाजपाने आपली ताकद महाराष्ट्रात वाढवली. आघाडी असली तरी प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतच असतो. भाजप, शिवसेना युती देखील याला अपवाद नव्हती. पण शिंदे साहेब आजपर्यंत महाराष्ट्रातल्या लोकांना कधीच बोललो नव्हतो, पण आज बोलतो. अनैसर्गिक युतीत आमच्यावर अन्याय झाला असा पाढा वाचण्याचे काम तुम्ही केले. मी काम करताना असा भेदभाव कधीच करत नाही. एक कोटी रुपये आमदार निधी होता, तो दोन कोटी मीच केला. आपण आल्याआल्या चार कोटी केला. त्यानंतर शिंदेसाहेब आपण एकत्र आल्यानंतर पाच कोटी केला. मी नगरविकास खात्याला कोट्यावधींचा निधी दिला.