मुंबई : मी कर्मचाऱ्यांना जेलमधून सांगितल होतं. विलिनीकरणाचा लढा पूर्णत्वाकडे जाणार आहे. माध्यमांनी मला सहकार्य केलं. माझी हत्या होऊ शकली असती पण तुमच्या गाड्यांमागे गाड्या होत्या. मी सत्याचा पाईक मी कधी खोटे बोललो नाही. तपास करण्याची पद्धत मला समजली नाही. मी लॉ मधील डॉक्टरेट असेल तरीही सरकार तुम्ही माझ्याबरोबर जे केल ते कष्टकऱ्यांसोबत करु नका. फडणवीस आणि गृहमंत्र्यांना विनंती की आमची हत्या झाली तर त्यात लक्ष द्या. भारताचे संविधान बलशाली आहे, असे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.