मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला, मुंबईतील नामांकित ठिकाणी घडला गंभीर प्रकार
सध्या धर्मांतरणाच्या कथित प्रकरणांनी संपूर्ण राज्याला हादरवून ठेवलं आहे. त्यातही अनेक गंभीर गुन्हे पहायला मिळतात. अशी एक घटना मुंबईसारख्या शहरात घडते, हे किती चिंताजनक आहे. अलीकडेच मालाडमध्ये बजरंग दलाने एक दावा केला आहे.
सध्या धर्मांतरणाच्या कथित प्रकरणांनी संपूर्ण राज्याला हादरवून ठेवलं आहे. त्यातही अनेक गंभीर गुन्हे पहायला मिळतात. अशी एक घटना मुंबईसारख्या शहरात घडते, हे किती चिंताजनक आहे. अलीकडेच मालाडमध्ये बजरंग दलाने एक दावा केला आहे.
प्रत्येकाच्या घरी जाऊन धर्मविषयक प्रचार आणि प्रसार केल्याचा आरोप बजरंग दलातील कार्यकर्त्यांनी केला आहे. या संबंधित व्यक्ती अनेक दिवसांपासून मुंबईतील मालाड या परिसरात अनेक लोकांचे मतांतर करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बजरंग दलातील कार्यकरत्यांनी कसून विचारपूस केल्यावर प्रकरण उघड झालं. हे प्रकरण समोर आल्यानंतर बजरंग दल आणि संबंधित आरोपींमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसदल पुढील तपास करत असून अयोग्य प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Published on: May 14, 2026 4:15 PM
Follow Us
