अमरावती : अमरावती शहरातील संत गुलाबबाबानगरमधील 300 अतिक्रमण धारक कुटुंबाना 7 दिवसात जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. अमरावती कृषी उत्पन्न समितीने नागरिकांना ही नोटीस दिली आहे. खासदार नवनीत राणा यांची या कुटुंबांनी भेट घेतली. यावेळी कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की कुणावरही अन्याय होणार नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.