औरंगाबाद – औरंगाबाद येथे अंबादास दानवे (anbadas danve)यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर हे स्वागत करण्यात आले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले या जिल्ह्याने औरंगजेबाला (aurangjeb)इथेच गाडले आहे. ज्या औरंगजेबाने मराठी मातीशी बेइमानी केली होती , मराठी (marathi)माणसांवर हल्ला केला होता. आताही त्याच प्रकारे काही पाच लोकांनी या मातीशी गद्दारी केली आहे.त्यामुळे या लोकांना पुन्हा निवडणून येऊ देणार नाही हे आमचा ठरल आहे. या पाच बरोबरच भाजपाही महत्त्वाचा आहे.