नाशिक : रविवारी नाशिक मुंबई महामार्गावर(Nashik-Mumbai highway) घोटी ते खंबाळे दरम्यान वाहतूक कोंडी झाली. तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ 3 किमी पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गाचे चौपदरीकरणाचे, उड्डाणपुलाचे काम चालू असल्याने तसेच रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि सुट्टी असल्यामुळे परतीच्या वाहनांची गर्दी वाढल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेलाही बसला असून तिही वाहतूक कोंडीत अडकली आहे. यामुळे वाहनधारकांना खूप मनस्ताप सहन करावा लागला.