आशिष शेलार यांनी अत्यंत मोठे विधान केले आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडीवर शेलारांनी ही विधान केल्याने एकच चर्चा सुरू झालीयं. आशिष शेलार यांनी थेट आता संजय राऊत यांच्यावर टिका केलीय. शेलार बोलताना म्हणाले की, ‘उखाड देंगे बोलणारे आता जेलमध्ये’ आहेत. संजय राऊत यांच्यावर ईडीने पत्रा चाळ प्रकरणी मोठी कारवाई केलीयं. याच प्रकरणी राऊत सध्या ईडीच्या कोठडीमध्ये आहेत. संजय राऊत यांच्या मैत्री बंगल्यावर धाड टाकत ईडीने संजय राऊत यांना आपल्या ताब्यात घेतले आहे. इतकेच नाही तर राऊतांच्या पत्नीला देखील ईडीने चाैकशीसाठी बोलावले होते.