सध्या हिवाळा सुरू आहे. त्यामुळे सगळीकडे कडाक्याची थंडी पडतेय. पण औरंगाबादमध्ये काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. औरंगाबादमध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. औरंगाबाद शहरात पाऊस सुरू होताच अनके भागातील वीजप्रवाह खंडित करण्यात आला. अवकाळी पावसामुळे शेतीवरही परिणाम होऊ शकतो. शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.