वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच , असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर हे देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलन देखील केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असून मोजक्या जणांच्या उपस्थितीमध्ये वारी सोहळा पार पडणार आहे. पंढरपूर संस्थाने प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे हा सोहळा पार पडणार आहे. मात्र, आता पुन्हा एकदा बंडातात्या कराडकर यांनी वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असे म्हटले आहे.