शेतकरी आणि कामगारविरोधी कायद्यांविरोधात बीडमध्ये आंदोलन

| Updated on: Sep 27, 2021 | 2:39 PM

केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास  1 वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे.

Follow us on

केंद्र सरकारने (Centre Government) तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास  1 वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे (Farmer) आंदोलन हे सुरु आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज (सोमवारी) शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत, कामगार कायद्यामध्ये बदल केलेला थांबवावा, अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी यासह विविध मागण्यांसाठी शेकाप आणि डाव्या संघटना आक्रमक झाले आहेत. शेकापकडून माजलगाव आणि केज येथे राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आला होता. यावेळी तब्बल एक तास वाहतूक खोळंबली होती.