पुणे : कोरोना निर्बंध शिथिलतेवरून राज्यात सध्या चांगलंच राजकारण रंगलय. पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्क्यांपेक्षा कमी असताना देखील पुण्याला दिलासा मिळाला नाहीय, त्यामुळे मुंबईला एक न्याय तर पुण्याला वेगळा न्याय का ? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. दुसरीकडे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत पालकमंत्री एक बोलतात, गृहमंत्री एक तर मुख्यमंत्री वेगळंच बोलत असल्याचा हल्लाबोल केला आहे.