भाजपच्या रेट्यासमोर सरकारला झुकावं लागलं : Ashish Shelar यांचा सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Mar 31, 2022 | 8:53 PM

हिंदू नववर्षा निमित्ताने गुढी पाडव्याला निघणाऱ्या स्वागतयात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकी होऊ नये अशी रचना सरकारची होती. पण जनतेचा रेटा वाढला, विरोधी पक्षांचा रेटा वाढला म्हणून अखेर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.

Follow us on

YouTube video player

मुंबई : राज्य सरकारने आज राज्यातील कोरोना निर्बंध पूर्णपणे (Unlock Maharashtra) उठवत असल्याची घोषणा केली. तसेच मास्क वापरणे हेही ऐच्छिक ठेवले. मात्र हे निर्बंध उठवायला एवढा उशीर का लागला? असाल सवाल आता भाजप नेते करत आहेत. हिंदू नववर्षा निमित्ताने गुढी पाडव्याला (Gudipadwa) निघणाऱ्या स्वागतयात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकी होऊ नये अशी रचना सरकारची होती. पण जनतेचा रेटा वाढला, विरोधी पक्षांचा रेटा वाढला म्हणून अखेर निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, विधानसभा सुरु असताना मी स्वत: याबाबत सभागृहात मागणी केली. त्यावेळी जाहीर केले नाही. त्यानंतर जनतेचा रेटा जेव्हा वाढू लागला तेव्हा रोष अंगावर येऊ नये म्हणून ठाकरे सरकारने आज निर्णय घेतला, असा आरोप आता भाजपकडून करण्यात येतोय.