आजवर भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा ऑपरेशन लोटसचे दावे झाले. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. माजी मंत्री म्हणू नका. दोन ते तीन दिवसात कळेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. चंद्रकांत पाटलांनी या वक्तव्यातून अप्रत्यक्षपणे राजकीय बदलांचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुढचे 25 वर्ष माजी मंत्री राहाल, असा टोला लगावला. याच प्रकरणावर सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !