महेंद्र मुधोळकर, बीड: भाजपच्या (BJP) नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या रागाचं कारण सांगितलं आहे. मला Hi मेसेज केला की भयंकर राग येतो. एकवेळ हॅलो ठीक आहे. पण Hi कायय? आपली संस्कृती बदलत आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) आपल्या रागाचं कारण सांगितलं आहे. शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. पुढे त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. एखादं पद येतं-जातं. पण लोकांच्या मनातून स्थान निघून गेल्यानंतर पुन्हा येणार नाही, असंही पंकजा म्हणाल्या.