मुंबई: “शपथविधीकडे मी तीन पद्धतीने बघते. देर आये दुरुस्त आये. नवीन मंत्र्यांनी चांगलं काम करावं, यासाठी त्यांना शुभेच्छा. 18 मंत्र्यांमध्ये एकही महिला मंत्र्याला संधी दिली नाही. आपल्या लोकसंख्येत 50 टक्के महिला आहेत. भाजपा संघटनेत अनेक चांगल्या महिला आहेत. आज कमीत कमी दोन महिलांना तरी शपथ द्यायला पाहिजे होती” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.