विधान परिषदेच्या निवडणुकीत नेमकं काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. “चमत्कार करण्याची आवश्यकताच नाही. विजय होईल आणि त्या दृष्टीने नियोजन झालंय. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादांच्या नेतृत्वात आम्ही या पाचव्या उमेदवाराच्या विजयासाठी मतदारांशी संपर्क केला. अनेक अपक्ष आमदार व काही पक्षाचे आमदार यांच्या मनातसुद्धा सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. सरकार ज्या पद्धतीने जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आलं, जनतेची कामं होतं नाही, याबद्दलचा असंतोष व्यक्त करण्यासाठी या विधान परिषदेच्या निवडणुकीत ते भाजपला मतदान करतील. याबद्दल त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं”, असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.