मुंबई: कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर राज्यासाठी एक सकारात्मक बातमी आहे. लॉकडाऊन लागू केल्यापासून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. सध्या सातारा, अहमदनगर आणि बारामतीमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे सांगली मनपा क्षेत्रात जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.