2019 मध्ये राज्य सरकारच्या 5 महत्वाच्या अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा झाला होता. या दौऱ्यावरुन आता राज्यात जोरदार राजकारण रंगलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनताना हे 5 अधिकारी इस्त्रायल दौऱ्यावर गेले होते. हे अधिकारी इस्त्रायला का गेले होते? असा सवाल महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेते आता विचारत आहेत. तर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी हे अधिकारी शेती विकासाच्या विषयाच्या अभ्यासाठी इस्त्रायल दौऱ्यावर गेल्याचं सांगितलं होतं.