भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने दिलेल्या निर्देशानुसार आजपासून सर्वच बँकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. आता बँका या सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार आहे. नव्या नियमाला आजपासून सुरुवात झाली आहे. पूर्वी बँका या दहा वाजता सुरू होत होत्या. नोकरदार वर्गाला या नव्या नियमाचा मोठ्याप्रमाणात फायदा होऊ शकतो. ऑफीस टाईमिंगपूर्वीच नोकरदार वर्गाला आता आपल्या बँकेतील कामे पूर्ण करता येणार आहेत.