हिंगोली : मराठा आरक्षणाचा महत्त्वाचा विषय आहे, हे आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं तेव्हा सर्वांनी मेहनत करुन आरक्षण दिलं, पण आता ते सुप्रीम कोर्टात आहे. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सरकार करेल. मराठा आरक्षणासाठी जे काही प्रयत्न लागणार आहे ते सरकार करेल, मराठा समाजाच्या मागे सरकार उभं आहे. ओबीसी आरक्षण देण्याचं काम आपलं सरकार आल्या आल्या मिळालं तसंच मराठा समाजाला मिळणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.