मुंबईः शिवसेनेच्या (Shivsena) आजची सभा अनेक कारणामुळे चर्चेत आली आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackrey) काही दिवसांपूर्वीच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल असं सांगितले होते. त्याच शिवसेनेच्या जोषात आणि आवेशात उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेला सुरुवात केली. सभेला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा आणत हिंदुत्वाचा आवेश भाजपकडून (Bharatiy Janata Party) आणला जात असल्याचे सांगत हे हिंदुत्वाचे रक्षक ते आहेत. मग समोर बसलेले कोण आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मुंबई मराठी माणसाने रक्त साांडवून मिळवली आहे. आंदण म्हणून मिळाली नाही. मुंबईवेगळं करण्याचा जो कोणी प्रयत्न करेल त्याचे तुकडे तुकडे केल्याशिवाय मराठी माणूस राहणार नाही आणि ते करून टाकू आम्ही असेही त्यांनी सांगितले.