नाशिक – शहरात सुरु असलेली पावसाच्या रिपरिप , त्यात स्मार्ट सिटीच्या(Samrat city) कामासाठी रस्ते खोदले आहेत. सततच्या पावसामुळे (Rain) शहरात सर्वत्र चिखल झाला असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील रस्त्यावर खड्यांची चाळण झाली आहे. महानगरपालिकेकडून दरवर्षी पावसापूर्व बैठकीचे आयोजन केले जाते. लाखो रुपयांचा निधीची घोषणा यासाठी केली जाते. पावसाळापूर्वीची कामे करत असताण शहारातील रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. यासाठी ठेकेदारांना दम दिला जातो. मात्र तरी शहारत नेमीचं येतो पावसाळा व नेहमीच पडतात खड्डे अशी स्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. शहरातील कुठल्याही परिसरात खड्डे नाहीत असे दिसत नाही. या खड्ड्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास(Travel) करावा लागत आहे ता