मतं मागताना लोक झुकलेले असतात, मात्र मतं मिळाल्यानंतर ती ताठ होतात. ओळख पण विसरतात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलंय. बीएमसी(BMC)च्या व्हाट्सअॅप चॅट बॉट या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अनेकांची काम खेटे घालूनही होत नाही. मात्र आता बीएमसीनं आणलेला हा उपक्रम लोकांची कामं सुलभरितीनं होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे, असं ते म्हणाले.