ठाणे : गेल्या वर्षभरात सीएनजीच्या (CNG) दरात तब्बल 28 रुपयांची वाढ झाली, मात्र या काळात रिक्षाभाडे अवघ्या दोन रुपयांनीच वाढले. रिक्षाभाड्यामध्ये वाढ करावी याकरता गेल्या तीन महिन्यांपासून रिक्षाचालकांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र दखल घेतली जात नसल्याने कोकण विभागातील पाच जिल्ह्याच्या रिक्षाचालकांनी संपाचा इशारा दिला आहे. भाडेवाढ न झाल्यास येत्या 31 जुलैपासून लाखो रिक्षाचालक बेमुदत संपावर जाणार आहेत.