पुणे : भाजपचे नेते रोज नवे नवे भाकीत करत असतात आणि ती प्रत्येक भाकीत खोटी ठरत असतात. आता हेही भाकीत खोटे ठरणार असून आमचे सरकार 2 वर्ष चालू आहे, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले. प्रभाग पद्धतीसंदर्भात आमचा आग्रह होता. त्याला पक्षीय स्वरूप नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत निर्णय घेतला आहे, मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. तिथल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल. परमविरसिंहाच्या बाबतीत माननीय गृहमंत्र्यांनी उत्तर दिलंय, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.