मुंबई : राज्याच्या वीज प्रश्नावर बोलताना काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)म्हणालेत, राज्यात सध्या विजेचा प्रश्न मोठा आहे. जनतेच्या प्रश्नाचं राजकारण (Politics) कमी आणि त्याला न्याय कसा देता येईल याविषयी काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आलंय. ऊर्जा विभागाचं खातं योगायोगाने काँग्रेसकडे आहे. राज्यात आज लोड शेडींग वाढलंय त्याचं कारण शोधायचं आहे. या त्रासापासून जनतेला कसं बाहेर काढता येईल त्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.