कोरोनाने कधीही भरुन न निघणाऱ्या जखमा दिल्या. विशी, पंचविशीतल्या तरुणी विधवा झाल्याने त्यांच्या जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालाय. कुणी सात महिन्यांची गरोदर आहे तर कुणावर दोन मुलांची जबाबदारी. तर कुणी घरी एकटं पडलेलं आहे. असे उघड्यावर पडलेली संसार बघून डोळे निश्चितच पाणवताय. या परिवाराच्या घरी जावून त्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न !