सोलापूर : सोलापूरच्या हक्काचे पाणी कर्नाटक पळवत असल्याच्या निषेधार्थ संभाजी आरमार संघटनेच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली. संभाजी आरमारतर्फे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ही निदर्शने करण्यात आली. सोलापूर शहरातील अनेक भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. तर काही भागात अद्यापही आठ दिवसाला एकदा पाणी मिळतं. ही वस्तुस्थिती असताना कर्नाटक सरकार सोलापूरच्या हक्काच्या पाण्यावर दरोडा टाकत आहे. याकडे सोलापूरच्या प्रशासनाचे दुर्लक्ष असून झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी आहे हे आंदोलन करत असल्याची भूमिका संभाजी आरामारची असल्याचे सांगण्यात येत आहे.