आमचे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत. महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत. तसेच आमचे तिन्ही उमेदवार हे राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे काही लोक आम्हाला सद्सद्विवेकबुद्धिने मतदान करतील, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. आमच्या तिन्ही जागा राज्यसभेत होत्या. त्यामुळे आम्ही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांनीही तीन उमेदवार दिले आहेत. त्यांना जर घोडेबाजार होऊ नये असं वाटत असेल तर त्यांनी आपला एक उमेदवार (Candidate) मागे घ्यावा, असं सांगतानाच आम्ही घोडेबाजार करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याचवेळी आम्ही महाडिक यांना मैदानात उभे केले आहे. त्याचा आम्ही काही तरी विचार केला असेलच ना… काही तरी स्टॅटेजी ठरवली असेलच ना. पण ही स्टॅटेजी आम्हाला उघड करायची नाहीये, असं फडणवीस यांनी सांगितलं.