VIDEO : Devendra Fadnavis | शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकणारी यंत्रणाच नाही : देवेंद्र फडणवीस

VIDEO : Devendra Fadnavis | शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकणारी यंत्रणाच नाही : देवेंद्र फडणवीस

| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 1:25 PM

दोन दिवसांपूर्वी (20 ऑगस्ट) मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होता. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांची प्राणज्योत मालवली.

दोन दिवसांपूर्वी (20 ऑगस्ट) मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील जी.टी. रुग्णालयात उपचार सुरु होता. डॉक्टरांनी त्यांचा प्राण वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न केले. पण त्यांची प्राणज्योत मालवली. सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील रहिवासी आहेत. ते शुक्रवारी (20 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मुंबईत मंत्रालय परिसरात आले होते. यावेळी ते गार्डन गेटजवळ येऊन छोट्या बाटलीतील कीटनाशक प्यायले. त्यानंतर ते जमिनीवर कोसळले त्यानंतर त्याना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्राणज्योत मावळली. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकणारी यंत्रणाच नाही.

Published on: Aug 23, 2021 01:24 PM