राज्यात कसलीही परिस्थिती गंभीर नाही, सर्व काही ठीक आहे. काही जण परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्याला कसे पुरून उरायचे हे शरद पवार यांचे मार्गदर्शन आपल्याला असल्यामुळे तशी काही परिस्थिती नाही. तशी काळजी पण करू नका, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. ते पिंपरी चिंचवड येथे बोलत होते. येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांच्या निवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील परिस्थितीबाबत भाष्य केले. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली असल्याचे विरोधक म्हणतात.